बुधवार, २४ जून, २०२०

संविधान

पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही,
स्वातंत्र्याची ही गं दशा आता काही बघवत नाही,
हिंमत नाही . !!ध!!

माफ कर बाळा मला नाही जमलं हे गं काम,
संविधान देशाचं ग जाळलंय नाही बघवलं,
'देश हा महान आमचा कसं सांगू कुणा ?'
स्वातंत्र्य ते काय असतं विचार कुन्या भक्तांला,
लोकांच्या दरबारी इथं लोकशाहीस किंमत नाही, !!१!!

सोन्या मोन्या (दोन्ही लेकरं) माफी द्यावी तुम्हा लय शिकाया लावलं,
पण त्या घटनेनं रक्त सारं  गिळून घेतलं,
नाही आम्हाला आराम नाही पोटा चारा,
दिस रात्र कष्ट आमुचं,
त्योच देशाला पहारा,
द्वेषा पाई भडकून, संविधान ते जाळून,
नारा मुर्दाबाद चा ग, गाजला त्या दिल्लीतं..
पण जनतेला गं इथल्या त्याच काही घेण नाही..!!२!!

जातीपाती ची ती तेढं लागली आता गं वाढू,
समतेचा तो ग वसा, लागलाय आता ढासाळू.
जणावरां इथं पुरे रक्षण मिळत हाई,
माणुस मातरं रोज मरतोय त्याची कुणा काही नाही,
धर्मनिरपेक्ष राष्ट्र चांगलं तेचं बाई,
कुठून पुन्हा मनु उठलाय
काही कळनां गं बाई.
शिकून मोठी हो गं बाऴा देशाला तू वाचवं,
द्वेषाच्या ह्या रस्त्यावर समतेची वाट बनवं.
आम्ही नाही केलं काही
पोरी तू तरी करं काही..!! ३ !!

देशद्रोही व्यक्ती त्या गं ज्यांन जाळलं ते पानं,
मिडीया ही त्यांचा च गं नाही घेतली दखलं,
जुल्माच्या ह्या बाजारात अन्याय होतं हाई
सरकार मातरं गप्पगार, विकासाच्या बाता हाई
वाचवाया लोकशाही
वाचवाया संविधान
शिक्षणाचा घेऊन ध्यास
लढ बाई देशासाठी.....

रोहित जगताप
२७ आँगस्ट २०१८
८९८३४५१५००

(टीप:- मूळ रचना अरविंद जगताप ह्यांची आहे. मी फक्त त्यांच्या लिखाणाचा लिबाज वापरून ही कविता लिहिली आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा